Friday, December 24, 2010

मतांच्या राजकारणात हिंदू झाला बदनाम

कांद्याचा भाव १०० रुपये किलो, लसून ३००, पेट्रोल ६३ रु. लिट, हा भाव सागळयांसाठी सारखा आहे की, हिंदू साठी अलग आणि मुस्लिमान साठी अलग आहे का? नाही ना..! सागळयाना ही झळ सारखीच बसती आहे, "आदर्श" मधले flats हे हिंदू सैनिकाना मिळणार होते की मुस्लिम, CWG मधे हिंदू धावणार होता की मुसमान, 2G Spectrum घोटाळयाची तर आकडेमोड जरी केली तरी "आकडा" येइल.
या सगळया गोष्टीवरुन लक्षात येत की खरच अपल सरकार हे Secular म्हणजेच "धर्मनिरपेक्ष" आहे. कुठल्या ही जाती, धर्माचा विचार ना करता त्यांनी व्यवस्थित पीळवाणुक चालवलेली आहे. सकरकारच ध्येयच आहे की GDP ८% पर्यंत जरी नाही गेला तरी चालेल पण "आम आदमी" हा आमच राहिला पाहिजे. त्याची जर प्रगति झाली तर तो विचार करायला लागेल, आणि विचारी माणस त्याना कधीच मतदान करणार नाहीत.
आता स्वत: च बिंग फुटायला लागले, घरात मवाणार नाही एवढ्या पैशाचा भ्रष्टाचार करुन झालय, आणि आता तो "आम आदमी" च्या समोर उघडा पडल्यावर सावरा सावर करण्या ऐवजी, त्याच डोक कस फिरवता येइल, त्याला रिकाम्या कामत कस गुंतवता येइल याची कारस्थान आमच सरकार करतय.
अयोध्या निकाला नंतर परत दंगली तर उसळणार नाही ना, या भीतीत सगळे होते, परंतु सपूर्ण देशात हिंदू व मुस्लिमानी सलोखा राखला, आणि एक वेगळच उदाहरण या जगा समोर ठेवल. परंतु हे या
सरकार ला पचलेल दिसत नाही. प्रतेक वेळेस Bomb Blast होतात कधी मंदिर तर कधी मज्जिद
हदारते तरी सुद्धा हिंदू मुस्लिम भांडत का नाहीत? याची सल त्याना लागलेली दिसत आहे. कारण
आता पुढच्या निवडणुकित हाच मुद्दा त्याना कमी पडणार आहे, कारण विकास तर त्यांनी काही केला नाही, उगाच भ्रष्टाचाराचा डोंगर रचून ठेवला आहे.
आम्ही किती चांगले हे ते जाणतेला दाखउ शकत नाही म्हणून, बाकीचे आमच्या पेक्षा कसे वाईट आहे हे सांगण्यात त्याना जास्त रस वाटतोय.