Saturday, October 16, 2010

परकीय भाषेतून कमाई....

भाषेचा उगम हा पाषाण युगा नंतर झाला,
अस मी कुठे तरी वाचल होत. पाषाण युग म्हणजे (Stone age).
आदी-मानव सुरवातीला खानाखुना करुन म्हणजे Sign Language मधे बोलायचा, नंतर हळू हळू संभाषणा साठी भाषेचा वापर होऊ लागला. वेगवेगळ्या जागे नुसार, संस्कृती नुसार त्याचा विकास होत गेला. आज जगात किती तरी भिन्न भिन्न भाषा बोलल्या जातात. बाकी जागाच राहू द्या बाजूला, आपल्या भारतातच बघाना प्रत्येक प्रांतात एक भाषा आणि प्रत्येक ५० किमी. नंतर त्याच भाषेची वेगळीच लय दिसून येते, उदा. महाराष्ट्रात मराठी एकच  भाषा पण किती वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. विर्भातली "वर्हाडी", कोकणातली "कोकणी,मालवणी", खानदेशातली "खानदेशी मराठी" मराठवाड्यातही एक वेगळाच लय एकायला मिळतो मराठीचा, त्यानंतर येते ती मुंबई ची "बंबईया मराठी", आणि पुण्याची "शुद्ध पुणेरी मराठी" ई.
   जस की मी वर लिहले की भाषेचा वापर हा संभाषणा साठी व्हायचा, आजही त्याच साठी होतो, पण आज त्या व्यतिरिक्त भाषेचा वापर पैसा कमावान्या साठी ही केला जाऊ शकतो. होय, कुठलीही परकीय भाषा शिका आणि "Transalator", "Dictator" म्हणून चांगल्या पगाराचा Job मिळवा. कामित कमी २००००/- हजार दर महा कमाऊ शकता...

Friday, October 8, 2010

झेंडयाचे महायुद्य..

आता नुकत्याच  महानगर पालिकेच्या निवडणुका जाहिर झाल्यात. कल्याण- डोंम्बिवालि महानगर पालिका निवडणुकीच्या बातम्या आपण रोज News Channel वर बघतोच आहोत. निवडणुका म्हटल की राजकीय चिखल फेकिचा गदारोळ सुरु होतो. पण आजकाल ह्याला नवीन रूप आलेल दिसतय, काल पर्यंत राजकारण्यां मधे चढ़ा ओढ़  होती.  आज मात्र पक्षाच्या झेंडया मधून ती दुसून येती आहे.
   सांगायच तात्पर्य आस की, आज राजकीय पक्ष आपल्या कार्य उंचवाण्या पेक्षा आपले झेंडे उंचवाण्यातच मग्न दिसतायेत. तुम्ही मुंबई मधे जाउन बघितलत तर तुम्हाला कळेल की कसा आपल्या पक्षा चा झेंडा दुर्या पक्ष्याच्या झेंड्या पेक्षा उंचवता येइल यातच राजकीय पक्ष जास्त लक्ष घालातायेत.
  ५ वर्षा आधी मी मुंबई ला जेव्हा गेलो होतो तेव्हा दादर हुन पुण्याला येणार्या रस्त्यावर एका चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर भला मोठा असा "भगवा" ध्वज भागितला, आणि त्या भगव्या कड़े बघतच रहवास वाटल, परत कही दिवसा नंतर मुंबई ला जाण्याचा योग आला,बघतो तर काय त्या भगव्या ध्वजा शेजारी मनसे नि आपला तेवढ्याच आकाराचा पण भगव्या पेक्ष्या एक हात उंच झेंडा रोवला होता. सुरवातीला जेव्हा बघितल तेव्हा डोक्यात

Thursday, October 7, 2010

महाराष्ट्रा बाहेरील बाळ ठाकरे...

              महाराष्ट्राची एकमेव ओळख, एकमेव अभिमान म्हणजे,
"छत्रपति शिवाजी महाराज". महाराजांनी रक्ताच पाणी करुन महाराष्ट्राची बाग़ फुलवली, जो महाराष्ट्र देशाच्याच नव्हे तर जगाच्या नकाशावर सर्वोतपरी प्रबळ ठरला होता. पण मध्यंतरिच्या काळात प्रतेका साठी आपली दारं  उघडी करुन देणारा महाराष्ट्र अनेकांच्या रंगात, रंगता-रंगता स्वतः चा रंग विसरायला लागला होता. परत गरज होती ती मराठी चा स्वाभिमान जागवण्याची, मराठी माणसाला एकत्र आणण्याची आणि ते काम घडल माननीय शिवसेना प्रमुख बाळा साहेब ठाकरे यांच्या कडून, पण त्याच बरोबर त्यांच्या वर बरीच टिका ही झाली. आजही बरीच महाराष्ट्रातलीच मराठी माणस त्यांच्यावर टिका करायला मागे पुढे पाहत नाहित.
        पण याच्याच उलट जेव्हा आपण महाराष्ट्रा बाहर जातो, तेव्हा महाराजां नंतर महाराष्ट्रा ची ओळख होते ती बाळा साहेब ठाकरे यांच्या नावानेच. मग ते बाहेरील प्रांतात असो की देशात, महाराष्ट्रा बाहर जेव्हा जातो तेव्हा साहजिक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे "Where are you from?"  महाराष्ट्र अस सांगितल्या वर "बाळ ठाकरे" असा काहीतरी reply  त्याच्या कडून मिळतो. काल पर्यंत ज्यांना
आपण महाराष्ट्रात राहून Fundamentlist म्हणत होतो आचानक आपण त्यांचे गुणगान गायला लागतो. त्या प्रांतात गेल्या नंतर तिथल्या लोकांच त्याच्या मात्रुभाषेवारिल वरील आणि त्यांच्या संस्क्रुतिवरिल प्रेम पाहून बाळा साहेबांच्या गोष्टी मनाला पटायला लागतात.

Monday, October 4, 2010

माझा बंगलोरू (Bangalore) प्रवास...


Bangalore कर्नाटकाची राजधानी, आणि भारताची Sillicon City.

म्हणजे IT Companies च माहेर घर, बरेच दिवसा पासून इच्छा होती तीथे जाण्याची, पण तसे योगच जुळत नव्हते. कारण तिथे जायचं म्हटलं तरी कुठल्या कारणाने, गेल्या नंतर रहाच कुठे, कारण तिथे कोणी ओळखीच हि नाही,
आमच्या काकांच्या तोंडून फार स्तुती एकली होती या शहराची, इथल्या IT Envornment बद्दल Lifestyle बद्दल, म्हणून इच्छा अधिकच तीव्र होत होती. पण वेळ आणि मार्ग नव्हता. योग्य वेळेची वाट बघण्या शिवाय पर्याय हि नव्हता, पण ते म्हणतात ना "सब्र का फल मीठा होता है." आणि Office तर्फे एका Testing Project साठी म्हणून आम्हाला Banglore ला पठवण्याची घोषणा झाली, आणि तेहि १, २ दिवसासाठी नहीं तर तब्बल ३ माहिण्यासाठी.
मी खुप आनंदात होतो, कारण आता जायला कारणही मिळाल होत आणि पैसे ही खर्च होणार नव्हते (ते जास्त महत्वाच होत).
पुणे ते Bangalore प्रवास
सकाळी १० वाजता  office मधून टिकिट  collect  करुन सरळ पुणे Station  ला पोहचलो, उद्दान Express लागलेलीच होती, तिथे मात्र एक घोळ झाला, आम्ही तिघे होतो पण आमचे डब्बे मात्र वेगले आणि टिकिट एकाकडेच...