Thursday, September 24, 2009

विदर्भ म्हटलं कि ?

विदर्भ म्हटलं कि आठवत ते फक्त शेतक-यांची आत्महत्या, दुष्काळ, तपतं उन्हं,आणि कुपोषण. खरचं येवठ्यातच सामावलय का हो विदर्भ? नाही, जिच्या पोटी शिवबा जन्मला, जिच्या संस्कारामुळे त्याने महाराष्ट्र घडवला, ति जिजाऊ विदर्भाने दिली, अशिच एक विदर्भ कन्या जिने श्रिक्रुष्णाचा संसार फुलवला ती रुख्मिणिमाता, हे आणि या पेक्षाही ईथे बरचं काही आहे. महाराष्ट्राचा नव्हे तर भारताचा एक विभ्भिन्न अंग आहे. महाराष्ट्राचा पुर्व भाग व देशाच्या मध्यभागी आसलेला प्रदेश विदर्भ म्हणुन ओळखला जातो. विदर्भ हा दोन भागात विभागलेला आहे. नागपुर आणि अमरावती विभाग, नागपुर,अमरावती,अकोला ही विदर्भातील सगळ्यात मोठी महत्वाची शहरं आहेत. ही झाली विदर्भाची प्रार्थमिक माहीती, आता बघुया काय खास आहे विदर्भात?
विदर्भाचा इतिहास:
भगवान श्रीक्रुष्णाला भुरळ घालणारी त्यांची पट्टराणी माता रुख्मिणि ही विदर्भ कन्या, रुख्मिणि हरणाची ऎतिहासिक घटणा विदर्भातील उम्रावतीत(सध्याचे अमरावतीत) घडली, विदर्भातिल राजघराण्यांची वंशवाळ फार मोठि आहे. भिष्मक राजा त्याचा पुत्र दक्ष,त्यांचे वंशज बुद्धभानू हलदर,पछाकर,रिमुपमर्दन,चित्रसेन,भिम,दम्मनंद,भोज,क्रम आणि कौशिक हे भाऊ क्रम चा नातु भिष्मक व त्याचि मुलगी रुख्मिणि. त्यानंतर १८ व्या शतकातकाआधी नागपुर ही भोसल्यांची राजधानी होती. नंतर स्वातंत्रसग्रामातही विदर्भाने वेगळ स्थान बनवल. विदर्भातील सेवाग्राम गांधीवाद्यांसाठी राजधानी होती. स्वातंत्रा नंतर विदर्भ मुबंई महाराष्ट्रात विलिन झाला.
भौगोलिक:सातपुडाच्या पर्वत रांगा विदर्भा जवळ आहे पण मोठ्या प्रमाणात टेकड्या ईथे आढळत नाही. ऎथील मेळघाट जंगल व चिखलदरा हे प्रेक्षनिय स्थळे आहेत. चंद्रपुरातील ताडोबा जंगल सुद्धा पाहाण्या सारखं आहे. जगातील आश्चर्य असणारे खारं पाण्याच सरोवर बुलठाणा जिल्हात लोणार ईथे आहे. वैनगंगा हि सगळ्यात मोठि नदी आहे.