Monday, December 2, 2019

एका आई चे कथन


मि कोणि मोठी लेखिका नाही, राजकारणी तर नाहीच नाहि, किंवा कुठल्या विषिष्ठ धर्माची Follower ही नाही.

मि फ़क्त माझ्या चिमुकली ची आई आहे, मला काळजी वाटते, भीती वाटते आणि असुरक्षित असल्याची सतत जाणीव होत राहते, आजच्या समजाच विदरक रुप बघुन. मला अस जाणवत कि आज समजात कुठलीच मुलगी, स्त्री किंवा लाहान मुलही सुरक्षित नाही.

आज मला social media आक्रोशाने भरलेले अनेक messages, posts बघायला मिळतात, तर कुणि whats app वर काळे DP ठेवुन निषेध नोंदवताना दिसतात. त्यातले अनेक तर मुळ मुद्दा सोडुन भावनिक आणि धार्मिक विषयावर टिप्पणी करणारे अधीक असतात.

पण ह्याहुन अधिक आपण करु तरी काय शकतो?
मेम्बत्त्या जाळा! petitions Sign करा! social media च्या पोस्ट शेर करा, आणि सरते शेवटि एखादा धर्मिक मुद्दा पेटवा.

परवा निर्भया होती, काल आसिफ़ा, आज डॊ. प्रियंका रेड्डी आहेत, उद्या अजुन कोणितरी असेल. परंतू परिस्थिती ही काल आज आणि उद्या ही तशीच दिसत आहे.

काय अजुन आपण अश्या एखाद्या घटनेची वाट बघतोय ? शांत बसने म्हणजे अश्या विक्रुत माणसिकतेला खतपाणी घालण्या सारख आहे.

हि एकच घटना नाही आहे, अश्या अनेक घटना सतत घडत आहेत, काही आपण विसरलो आहोत तर कितितरी घटना पुढेच आल्या नसतिल.

किंबहुना ज्या घटना पुढे आल्या आहेत, त्यातले किती  आरोपी सिद्ध झालेत किंवा जे सिद्ध झालेत त्यातल्या किती लोकांना कठोर शिक्षा झाली. कित्तेक वर्ष जातात त्यांना आरोपी ठरवायला  आणि त्यांनंतर शिक्षेचीअंमलबजावणी करायला.

हा कसला कायदा? अरोपीने गुन्हा कबुल केल्या नंतर ही सरकार आणि न्यायालयाना औपचारिक प्रक्रिया पुर्ण करावी लगते हे सांगण्या साठि की ते गुन्हेगार आहेत ही नाही.

सध्या पुरता जणतेचा आक्रोश शांत करण्यासाठी आरोपी ना फ़क्त तुरंगात डांबुन पिडितेला न्याय मिळणार का?

कुर्ग (भारतचे स्कोटलंड)


मला या निसर्गाने आणि त्याच्या सौंदर्याने नेहमीच आश्चर्यचकित केलय.
भारत हा जसा भाषा आणि संस्क्रुतीच्या विविधतेने नटलेला देश आहे,
तसेच निसर्गाने हि त्या सुंदरतेच्या विविधतेची उधळन मनसोक्त केली आहे.
जेव्हा कधी मला ह्या निसर्गाची पवित्रता अनुभवायची मिळते तेव्हा तेव्हा मन उचंबळुन येत.
तर अश्याच एका निसर्गाच्या सानिध्यातील सहलीला आम्हि निघालोय.

The South western part of कर्नाटक, जिथे निसर्गाने अशी काही जादु केली आहे जी आम्हि शहरांमधे हरवुन बसलोय. आम्ही निघालोय "कुर्ग" ला.

निसर्ग सौदर्य, स्थानिक स्वदिष्ट जेवन, आणि Coffee च्या झाडांची बंदिस्त सुगंध.
आरामदायी ट्रिप ला अजुन काय हवय?

आम्हि कुर्ग च्या दिशेने असताना अमच्या लिस्ट मधे पहिला स्टोप होता. बालेकुपे मधिल golden temple,
हि एक तिबेटियन मोनेस्ट्रि आहे, तिबेटियन संस्क्रुतिला भारतात एक वेगळेच महत्व आहे.
तिबेटच्या बहेरील हि मोनेस्ट्री दुसर्या क्रमांकाची आहे, या मंदिराची बांधनी आणि Structure खरच तुम्हाला inspire करुन जातं.

त्यानंतर आम्ही निघालो अमच्या दुसर्या stop कडे, "दुबारे Elephant camp" आणि वॉटर राफ्टिंग.
जिथे अम्हि जास्त मजा केली ति म्हणजे वॉटर राफ्टिंग, नदिच्या मधोमध जावुन पोहणं काय असत हे अम्ही तिथे  अनुभवलं.

ति धमाल अनुभवल्या नंतर अम्हि निघालो आमच्या Resort कडे निसर्गाच्या कुशीत असलेल्या या Resort मधे आम्ही मुक्कामी थांबलो, जिथे रात्र या विचारत जात होती कि सकाळी अजुन काय नवीन बघायला मिळणार.

सकाळी उठल्यावर तिथला परिसर बघुन मन प्रसन्न झाल. रात्री भयान अंधारातला हा Resort मात्र सकाळी सुर्यकिरणानी न्हावुन निघलेला परिसर मन सुखावुन गेला.

इथल्या अद्भुत जंगलात निस्र्गाचे अनेक मोती दडलेले आहेत, त्यातच ताठ मनेने उभ असलेल हे "थलकावेरी मंदीर". हे मंदीर कावेरी नदिच उगम स्थान, जिथे निसर्ग मोठया सुंदरतेने आपले रंग बदलत असतो.

त्याच्याच  पुढे  मेडेकरी गावापासुन ८ कि.मी. अंतरावर आहे आबे फ़ॊल, जो Coffee बागांनी वेढलेला आहे आणि इथले कोसळणारे धबधबे हे कावेरी नदिला जोडणारे आहेत .

त्या नंतर बघायला मिळाल ते निसर्गधाम Forest, जे बांबु च्या व्रुक्षानी दाटलेल आणि अनेक पक्षानी नटलेल.

कुर्ग आणखी एका गोष्टि साठी प्रसिध्द आहे ते म्हणजे इथले मसाले, Coffee Beans, Home Made Wine’s, आणि Home Made Chocolate’s साठी. अश्च्र्याची गोष्ट म्हणजे ह्या वाईन्स मधे Alcohol contains नाही.

अश्या प्रकारे अम्ही इथले मसाले आणि Chocolate’s घेउन अमच्या परतिच्या दिशेने निघालॊ.
परंतू आमचा प्रवास इथेच थांबत नाही, Because this is not a destination.


Friday, August 12, 2016

आधुनिकता मनोरंजनाची

दिवसागणिक आधुनिकतेच्या जोडीने सतत नावीन्यपूर्ण पद्धतीने वाढत असलेलं क्षेत्र म्हणजे करमणूक आणि मनोरंजनाचे क्षेत्रकुण्याकाळी राजदरबारांमध्ये राजाश्रयाने मनोरंजनाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढीस आलेनवनवीन प्रयोग घडत गेलेत्या काळातील कलेची जाण असणाऱ्या राजा माहाराजांनी कलाकारांना मोठं केलंसंगीतनाट्यनृत्यखेळ अश्या अनेक कला-गुणांना वाव मिळाला.   
त्यांनतर हेच मनोरंजनाचे क्षेत्र राजदरबारातून बाहेर येत जनसामान्यात मिसळलं वगनाट्यपथनाट्या द्व्यारे मनोरंजना सोबतच समाज प्रबोधन आणि क्रांतिकारी चळवळी  माध्यम बनलं
ब्रिटिश काळापासून ह्या क्षेत्राला तंत्राद्यानाची जोड मिळालीरेकॉर्ड-प्ल्येयररेडिओट्रान्सिस्टरवरून मनोरंजन हे घराघरात पोहचलंत्याच काळात तंम्बुत पडद्यावर दाखवला जाणारा सिनेमा इंग्रजांनी भारतात आनलात्यावर दादासाहेब फाळके नावाच्या अवलियाची नजर पडली आणि भारतीय चित्रपट श्रुष्टिचा जन्म झाला
त्यांनी "राजा हरिशचंद्रहा भारतातील पहिला मूकपट बनवला आणि भारतीय मनोरंजन क्षेत्राची व्याप्ती अजून विस्तृत केली
कालांतराने त्यात आवाज आला मग रंग आलेत आणि 70mm पडद्यावर इस्टमन कलर सहित अनेक कलाकार हे स्टार आणि सुपरस्टार झालेत.
1965 नंतर दृश्य स्वरूपातील मनोरंजन घराघरात पोहचवण्यासाठी Television म्हणजेच दूरदर्शन ने मोलाचा वाटा उचललात्यावर येणाऱ्या बातमीपत्रमालिका सहित जाहिरातींनी सुद्धा जनमाणसाच्या मनावरती छाप उमटवली.
कालांतराने त्यात आवाज आला मग रंग आलेत आणि 70mm पडद्यावर इस्टमन कलर सहित अनेक कलाकार हे स्टार आणि सुपरस्टार झालेत.
1965 मध्ये सुरु झालेला आणि 1980 नंतर दृश्य स्वरूपातील मनोरंजन घराघरात पोहचवण्यासाठी Television म्हणजेच दूरदर्शन ने मोलाचा वाटा उचललात्यावर येणाऱ्या बातमीपत्रमालिका सहित जाहिरातींनी सुद्धा जनमाणसाच्या मनावरती छाप उमटवलीदूरदर्शन वरील काही मालिका ह्या जगातील Television इतिहासातील सर्वाधिक बघितल्या गेलेल्या मालिका आहेत ज्यामध्ये महाभारतरामायणकृष्णा सारख्या पौराणिक मालिकांचा समावेश आहेत्याव्यतिरीक्त प्रेक्षकांच्या मनावर आरूढ होणाऱ्या मालिका म्हणजे अलिफ-लैलाविक्रम वेताळब्योमकेश बक्षीफौजीसर्कसमालगुडी डेसदेख भाई देख आणि सर्वांचं लाडका शक्तिमान अश्या अनेक मालिका त्या काळात प्रसिद्धीचे रेकॉर्ड ब्रेक करत होत्याआज 800 हुन अधिक TV_Channels उपलब्ध आहेत ज्यात अनेक भाषणांमध्ये 
मनोरंजनाचे कार्यक्रम लोकांपर्यंत पोहचवले जातात

मनोरंजनाच्या व्याप्तीच कारण ठरलं ते म्हणजे तंत्राद्याना मधला बदलआणि त्याबदलाला आत्मसात करत मनोरंजन क्षेत्र अजून व्यापक होत गेलंसुरवातीला फक्त पडद्यावर बघायला मिळणाऱ्या मनोरंजनाच्या गोष्टी घराघरात TV बघायला मिळू लागल्यात आणि आता तर त्या तुमच्या आमच्या खिश्यात म्हणजेच आपल्या मोबाईल फोन च्या स्क्रिन वर सुद्धा उपलब्ध झालेत.. आज Google च्या Youtube वर अनेक Channels उपलब्ध आहेत जे तुमच्या आमच्यातल्याच कलाकाराने स्वतः बनवून सगळ्याच्या मनोरंजना साठी सादर केले आहेत.. 
ज्याच्या मध्ये कलाकार दडलेला आहे परंतु संधी मिळत नाही अश्याना जगासमोर कला सादर करण्यासाठी  Youtube हे उत्तम प्लॅटफॉर्म आहेमात्र आज Youtube नवीन कलाकारांसोबतच जुने जाणते कलाकार हि मनोरंजनाचा धुमाकूळ घालताना आपण बघतोय.. सध्या च्या घडीला भारतातील Youtube वर भरपूर प्रसिध्द्वअसलेले Channels म्हणेजच  TVF (the viral fever), AIB Pretentious movie review , 
हा fever सध्या मराठीत हि चढलेला दिसतोय त्यात सगळ्यात फेमस होतोय तो म्हणजे BaDiPa channel चा Casting Couch with अमेय and निपुण  हा शोत्यांनतर पसंतीस पडतोय तो संतोष आणि कुशल चा struggler_saala अशे इतरही शो प्रेक्षांसाठी त्यांच्या मनोरंजना साठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.   
भारतात Vines हा प्रकार सुद्धा BB ki vines ने खूप प्रसिद्ध केला.. मराठीतही हा प्रयोग काही अंशी झालेला दिसतोय.
अश्याच प्रकारे जसजसा नवनवीन गोष्टी समोर येतील तासतशे मनोरंजन क्षेत्र ते आत्मसात करत अप्लाय व्याप्ती वाढवत राहील.

Thursday, August 4, 2016

मुख्यमंत्री महोदय "ऑडिट" चेही ऑडिट करा...

"कोकणात पूल कोसळून दुर्घटना झाल्यानंतर राज्यातील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय जाहीर झाला असताना, मुंबई महापालिकेनेही मुंबईतील ३१४ पुलांची तपासणी करण्याची कार्यवाही सुरू केली आहे."-- एक बातमी 

गेल्या काही वर्षात प्रत्येक वृतु मध्ये काही ना काही तरी  घडताना आपण बघतो आहोत.
हिवाळ्यात थंडीने बळी जातात तर उन्हाळ्यात उष्मघाताने
उन्हाळ्यात दुष्काळ पडतो, पिण्याच्या पाण्यासाठी वन-वन भटकावं लागत.
त्यात राजकीय वातावरण तापत, मग रेल्वेनी पाणी पाठवलं जात, आणि पुन्हा घोषणा आणि आश्वासन दिली जातात कि पाट-बंधार्याचं काम नीट झालं नसल्याने हि वेळ आली. आता जिथे नीट कामे झाली नाहीत त्या सगळ्यांचं "ऑडिट" करण्यात येईल. मग पावसाळा येतो आणि उन्हाळ्यातील पाट-बंधार्याचं आणि इतर "ऑडिट" ची चर्चा हि पुढील उन्हाळ्या साठी स्थगित होते.
आता पावसाळ्यात सगळं नीटच होणार असं चित्र दिसत, त्यात मुंबई-महाराष्ट्राच्या रस्त्यांवरील खड्ड्यांचे  छोटे मोठे वाद, आरोप-प्रत्यारोप चालू होतात आणि त्यावर हि तोडगा निघतो ते म्हणेज चॊकशी आणि "ऑडिट". हि चर्चा अजून चिघळणार त्यात इतर घडना घडून जातात त्या म्हणजे महामार्गावर कोसळणाऱ्या दरडी असोत वा रेल्वे चे सरकणारे रूळ मग त्याची परत सुरु होते ती म्हणजे चॊकशी आणि "ऑडिट". ह्या चॊकशी आणि "ऑडिट" मध्ये अधिकारी आणि प्रशाषण व्यस्त असत तेवढ्यात माळीण गावालाच पाहाडाने गिळणंकृत केल्याची माहिती मिळतेमग मागणी होते कि अजून असे किती गाव पायथ्याशी वसले आहेत जे धोकादायक स्थिती मध्ये आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यासाठी सुरक्षेच्या योजना राबवल्या पाहिजेत. मग वरून एक आदेश येतो कि ह्या सगळ्या गावाची चौकशी आणि "ऑडिट" करा.. आणि सुरु होते पुन्हा चौकशी आणि नवीन "ऑडिट".
आता ह्या भरीत भर म्हणेज महाड मध्ये झालेली ह्या वर्षीची घटना... 
ह्या घाटाने नंतर जीर्ण झालेल्या पुलांच्या "ऑडिट" चे आदेश सरकारने दिले नसते तर नवल
लगेचच चौकशी करून पुलांच्या "ऑडिट" करण्याचे निर्णय सरकार ने घेतला, मग ह्या आधी मार्च महिन्यात जे  ऑडिट महाड च्या आणि इतर पुलांचे ऑडिट केले होते ते काय होते?
हे ऑडिट झाल्यांनंतर हि जर पूल वाहून जातात तर मग आता त्या झालेल्या "ऑडिट" चे हि ऑडिट करण्याचे आदेश सरकार देणार का?
 जीर्ण झालेले वाडे, जुन्या इमारती, ब्रिटिशकालीन पुल, महामार्गावर कोसळणाऱ्या दरडी , वाहून जाणारे रस्ते, रेल्वेचे रूळ, नदीपात्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढणारे अतिक्रमण, बेकायदेशीर वृक्ष तोड, प्रदूषण  इतर बरच काही आपल्या समोर वाढून ठेवलं आहे, ज्याचे वेळेवर जसे ऑडिट होणे गरजेचे आहे तसेच त्यावर कठोर कारवाई करणे अत्यंत महत्तवाचे आहे.